जामनेर च्या कोठारी बंधू तर्फे २ शेतकऱ्यांची तब्बल ५ कोटी रुपयांची फसवणूक : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !
पोलीस अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिकेचा आरोप !


जळगाव : धनवीरसिंग ठाकूर , जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुकयातील महावीर कृषी बाजार ( खाजगी मार्केट ) संचालक अतुल कोठारी , ईश्वरलाल कोठारी आणि सुरेश कोठारी ह्यांचा धान्य खरेदी विक्री च्या व्यवसाया ची आड घेऊन कोट्यावधी रुपयांची अवैध सावकारी करून कोट्यवधी रुपयांची वाटप करत लाखो रुपयांची व्याज कमावल्यासह अनेक शेतकऱ्यांची शेती माल घेऊन परस्पर विक्री करून त्या शेतकऱ्यांना कुठलाच मोबदला न देत. आज वर पर्यंत उघड झालेल्या दोन शेतकऱ्यांच्या तक्रारी पैकी सुनील गुज्जर नेरी येथील शेतकरी ह्यांच्या सोबत सुमारे ३ ते ४ कोटी आणि सुनील लांडगे ता.भोकरदन जी.जालना ह्यांच्या सोबत हि १ कोटी ९८ लाख २५ हजार ६०० रुपयांची शेतकी माल परस्पर रित्या विक्री करून ह्याही शेतकरी सोबत गंभीर आर्थिक फसवणूक करून कुठलाच मोबदला आज पावेतो दिल्या नसल्याची माहिती मिळत आहे.
सुनील गुज्जर ह्यांचे शेतकरी समूह जामनेर तालुक्यातील नेरी गाव येथून जामनेर येथील खाजगी महावीर कृषी बाजार येथे कोरोना काळा दरम्यान मक्का आणि अन्य शेतकी उत्पादन महावीर मार्केट संचालक ह्यांचे सोबत भाडे तत्वावर ठेवण्यात आला होता. पश्चात कोरोना लोकडाऊन लागल्या मुळे शेतकरी आपला माल मार्केट मध्ये बघण्यास जाऊ शकत नसल्याचं बघून महावीर मार्केट संचालक ह्यांनी लालच करून गरीब शेतकऱ्यांची शेतकी उत्पादनाची परस्पर विक्री करून पूर्ण रक्कम हडप केल्याची घटना उघडकीस आली आहे.
सुनील गुज्जर तसेच त्यांची पत्नी ह्यांनी अनेकदा पोलीस विभागाच्या पायऱ्या झिजवत आपल्याला न्याय मिळेल ह्या अपेक्षेत अनेक पोलीस अधिकाऱ्यांची विनवणी केली परंतु. कुठल्याच पोलीस विभागातून ह्या पीडित दंपती ला कुठलीच न्याय मिळण्याची कुठलीच कार्यवाही होत नसल्याची बघत.
आमरण उपोषण केले परंतु अनेक दिवस उलटूनही कुठलीच शासकीय यंत्रणा ह्यांच्या मदतीला आली नाही. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यांचेवर पॉलिसी कार्यवाही करून त्या वेळेस हि त्यांचे प्रकरण कुठल्याच न्याय निवाड्यात आले नाही.
सुनील गुज्जर ह्यांनी मंत्रालय मुंबई येथे देखील आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळेस हि त्यांचे वर पॉलिसी कार्यवाही करून त्यांच्या मागणीला कुठलाच थारा मिळाला नाही.
पुन्हा सुनील गुज्जर ह्यांनी आजाद मैदान येथे आमरण उपोषण करण्यासाठी बसले असल्याची दाखल घेत वरिष्ठ मंत्र्यांना लोकशाही मार्गाने निवेदन देऊन आपले उपोषण सुरु ठेवले आहे.
भारत देशात कृषी प्रधान देश म्हणून ओळख जरी असली तरी मात्र येथील शेतकरी हे नाम मात्र फक्त मते घेण्यासाठी असल्याचे भासत आहे. कारण कुठलीच न्याय तपास यंत्रणा ह्या गोर गरीब शेतकऱ्यांची कुठलीच तक्रार ऐकण्यात राजी नसल्याचे दिसत आहे. कारण संबंधित कोठारी बंधू ह्यांनी आज पावेतो अनेक पोलीस अधिकाऱ्यांना बक्कळ लाच देऊन तपास बंद करण्यास भाग पडले आहे.
शेतकरी आत्मदहन सारखा प्रयत्न करीत असतांना ? कुठल्याच न्यायिक यंत्रणेला ह्यांची काळजी नाही का ? तब्बल २ वर्षां पासून ह्या शेतकऱ्यांची कुठे ना कुठे काही ना काही तक्रारी देणे सतत सुरु असल्याचेही कुठलेच कार्यवाही का होत नाही ? संबंधित कोठारी बंधू ह्यांच्या प्रवर्तन निर्देशनालाय तर्फे न्यायिक चौकशी होणे गरजेचे आहे.
पोलीस यंत्रणेतील दोषी अधिकाऱ्यांची तातडीने चौकशी होऊन माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे योग्य ती कार्यवाही होण्यासाठी शेतकऱ्याला मदत करतील का ह्या कडे सर्व सामान्य जनतेचे लक्ष लागून. पुढील होणाऱ्या सर्व कार्यवाही कडे प्रसार माध्यमांचे लक्ष लागून. बयूरो रिपोर्ट भारत लाईव्ह न्यूज मीडिया !